घाटीतील नूतन मित्रांना एका कवितेत एक करण्याचा हा तुटक प्रयत्न..
नवे मित्र, नवे शहर,....
नवे अनुभव, नवी लहर,...
नवा बहाणा, आलाय कवितेचा बहर.....
मी चैतन्य जसा अबोल तसा धन्य, कवितांचे संगे घेवून सैन्य,,
समिरासाराखेच माझे अस्तित्व, ते जाणवते जरी दिसते नगण्य..
राहुल तुझ्यासह प्रत्येक पाऊलावर, दुखांनी चाहूल सुद्धा केली नाही,,
माझ्या मनातील हळवेपणाला तू हळुवार सावरतांना, चाहूल सुद्धा दिली नाही..
नावापेक्षाही निर्मळ, सरळ तसा दुर्मिळ ही, जणू सहजतेचा अनन्वय,,
कधी कठीण कौस्तुभ, कधी घाटीतील कनवाळू केतानात, प्रेम क्षेमाचा समन्वय..
बळवंत तुझे असणे जिवंत, जणू प्रशांत विनोदाची आरास अनंत,,
क्लेशाचा विनाशकारी निलेश, शैलेश, संतोष, विजयानंद असल्यावर कसली खंत..
कपिलाचा प्रगल्भ प्रकाश आम्हा, अन किरण हे अदभूद्याचे,,
आम्ही श्रीराम स्थिर महावीर,, घेवूनी ध्येय उदयाचे, ठेवतो बंध हृदयाशी हृदयाचे..
श्याम असा सुंदर सखा, मग बघा, का न? मला माझा गौरव नसावा,,
ज्या अतुल अनुरागने आपणासह माझी आपुलकी, मी ही तितकाच आपला असावा..
मी ही तितकाच आपला असावा…. मी ही तितकाच आपला असावा….
मी ही तितकाच आपला असावा…. मी ही तितकाच आपला असावा….
या अवघ्या सात महिन्यातच, घाटीच्या सप्तरंगात रंगणारे आम्ही,,
रुग्नांच्या एकेक वेदनेला, जखमेला, आईच्या हाताने स्पर्शणारे आम्ही,,
आज रसिक बनून जीवन जगू शकत नसलो, तरी जीवनात रसिकता जपणारे आम्ही,,
आज मंगळावर जीवन शोधू शकत नसलो, तरी जीवनात मंगळ शोधणारे आम्ही..
अशा माझ्या सर्व पी . जी. मित्रांसाठी ,,
मी यशो शिखरी पोहचलो तरी आपणावाचून रिता आहे,,
कारण....
जिचा आरंभ ही नाही आणि अंत ही नाही, मैत्री अशी एक कविता आहे..
मैत्री अशी एक कविता आहे.. मैत्री अशी एक कविता आहे…..
आपलाच
सचिन शेंडे..
२ टिप्पण्या:
Hey heard 1st time @ IRCON just Awesome, u need to go further with ur poems, after reading u r blog i feel relaxed.
good to read all that.
Best of luck.
Thanks sir, i shall try my best...
टिप्पणी पोस्ट करा